-->

Ads

Jalna lathi charge | जालन्यातील लाठीचार्जवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा नेमकं काय म्हणाले

जालना लाठीचार्जच्या घटनेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटवर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. अजित पवार यांच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.



मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण मराठा आंदोलकांसोबत आहोत. लाठीचार्ज करणारे पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. तसेच त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मराठा कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो”, असंही ते म्हणाले

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो”, असंही ते म्हणाले



 

Post a Comment

0 Comments