Thane News: काही दिवसांपूर्वी मुंबई-नाशिक महामार्गालगत कसारा घाटात दोन महिन्यांपूर्वी दोन जणांचे मृतदेह आढळून आले होते. आता या हत्येचा उलगडा झाला आहे. पोलीस तपासांत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत चार आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. हत्या झालेल्यांपैकी एकजण महिलेस सोशल मीडियावरून मेसेज आणि फोन करून त्रास देत होता. याच रागातून हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. कसारा पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.
मुंबई-नाशिक महामार्गालगत कसारा घाटात दोन महिन्यांपूर्वी दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात १९ जून रोजी हत्येचा गुन्हा दाखल झाला. कोणत्यातरी कारणावरून दोघांची हत्या करून नंतर मृतदेह कसारा घाटात आणून टाकण्यात आले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील साहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि अन्य कर्मचारी, तसेच कसारा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तपासासाठी पथक स्थापन करण्यात आले.
पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने हा गुन्हा अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. अशा प्रकारे या प्रकरणात पोलिसांनी नाशी याच्यासह कुणाल प्रकाश मुदलीयार (२३), प्रशांत अंबादास खलुले (२५), फिरोज दिलदार पठाण (१९) या चौघांना अटक केल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली. सर्व आरोपी नगरचे असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रमेश तडवी करीत आहेत. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सुफियान हा सोशल मीडियाद्वारे महिलेस फोन आणि मेसेजद्वारे सतत त्रास देत होता. याच रागातून हा गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
0 Comments