-->

Ads

देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नढढा जी यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशात विभाजन विनाशिकाहा कार्यक्रम आयोजित

 


प्रतिनिधी रेखा भेगडे :देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नढढा जी यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशात विभाजन विनाशिकाहा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या अंतर्गत दिनांक 14/08/23 वार सोमवार रोजी संध्याकाळी साडे चार वाजता पिंपरी येथील बाबा छंतुराम लाल मंदीर येथे आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटन आणि सेंट्रल पंचायत याच्या संयुक्त विद्यमाने विभाजन का दर्द या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 1947 साली आपल्या देशाची फाळणी झाली आणि भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करण्यात आली यावेळी सिंध प्रांत संपूर्ण पणे पाकिस्तान ला देण्यात आला आणि त्या मुळे तेथील सिंधी आणि शिख बांधवांवर निर्वासित होण्याची वेळ आली याच्या आठवणी या वेळी त्या फाळणी चे साक्षीदार जे आजही आहेत त्या पैकी काही जेठय नागरिकांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले


  या वेळी बोलताना शिवनदास पमनानी, आणि कन्हैयालाल केसवानी यांनी सांगितले की त्या वेळी तेथील मुस्लिम समाजातील लोकांनी प्रचंड अत्याचार केले आणि अनेक बांधव तेथेच मुस्लिम धर्म स्वीकारून राहीले पण कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त होते ते भारतात तेथील संपूर्ण संपती सोडून भारतात आले त्या वेळी महाराष्ट्रातील उल्हासनगर आणि पिंपरी येथे त्याच्या साठी छावणी उभारण्यात आली तेव्हा पासून ते भारताचे नागरिक म्हणून राहू लागले 

आणि विषेश म्हणजे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी त्यांना आपले मानून आज ही मनापासून एकत्र नांदत आहेत 

 यावेळी भगवानदास खत्री, शिवनदास पमनानी, कन्हैयालाल केसवानी, आणि गणेशोमल पंजाबी यांचा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे दक्षिण आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, ज्योतीका मलकानी, रेखा कडाली, वैशाली खाडये, गणेश ढाकणे, गणेश वाळुंजकर, शितल शिंदे, शैलेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी बोलताना शहराध्यक्ष जगताप म्हणाले की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली आपला देश जगातील तिसर्‍या अर्थ व्यवस्था असलेला देश म्हणून जगासमोर आणायचा आहे आणि त्या साठी आपण सगळे मिळून एकजुटीने त्याच्या मागे उभे राहून देश जगातील सर्वात प्रगत करण्याचा प्रयत्न करूया 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर जेठवानी, गोपी आसवांनी, किरण रामनानी,कंचन  रामनानी, जयदेव डेब्रा, राजेश चांदवानी, अजीत कंजवानी, मनोज पंजाबी, इंदर बजाज, सुशिल बजाज, हेमंत राजेश सारिका मँडम आदींनी परिश्रम घेतले



Post a Comment

0 Comments