ही आतापर्यंत मोठी कारवाई असून यात 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
नाशिक, 11 ऑगस्ट : प्राप्तीकर विभागाकडून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून जालना जिल्ह्यात छापेमारी सुरू आहे. यादरम्यान स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांकडून तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता प्राप्तीकर विभागाकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या छापेमारीची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांची कर वाचवण्यासाठीची एक चलाखी जीएसटी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्याचे समजते.जालना धाडीत ५६ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून १४ कोटींचे सोने, सोन्याचे दागिने, बिस्कीट जप्त करण्यात आले आहेत. ही सगळी जप्त केलेली रक्कम जालन्याच्या SBI शाखेत जमा करण्यात आली आहे. उर्वरित ३५० कोटींच्या आसपास बेहिशेबी आर्थिक व्यवहार असल्याचंही समोर आलं आहे. २०० प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आणि ५० पोलिसांच्या मदतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. 12 मशीन्स असूनही नोटा मोजण्यासाठी तब्बल 14 तासांचा अवधी लागला.
0 Comments