-->

Ads

चक्क शेळी आणि बोकडाचं लग्न लावलं, बारामतीतल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा
बारामती, 3 फेब्रुवारी : पाण्यासंदर्भात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क शेळी आणि बोकडाचं लग्न लावलं आहे. बारामतीतील या आंदोलनाची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. ‘कोर्टाच्या आदेशानंतरही आम्हाला पाणी सोडलं जात नाही. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला लवकरात लवकर सोडावं,’ अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ‘शासन आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही. म्हणून आम्ही हे वेगळं आंदोलन केलं आहे. या विवाहात आलेल्या आहेराची रक्कम आम्ही सरकारला मनीऑर्डर करणार आहोत,’ असंही आंदोलनकर्ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments