एक लग्नाची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील सामान घेऊन फरार झालेल्या नवरीबाईसहएका महिला दलालाला राजस्थानच्या जालोर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, भीनमाळच्या माघ कॉलनीत राहणारा अभिषेक उर्फ धरमचंद जैन याने सीता गुप्ता नावाच्या महिलेशी पूर्ण रितीरिवाजाने लग्न केलं होतं. स्वरूपगंजमध्ये राहणाऱ्या मनीषा सेनच्या मध्यस्तरीनंतर हा विवाह झाला होता. लग्नापूर्वी मनीषाने सांगितलं होतं की, सीता ही एक साधी घरगुती मुलगी आहे आणि ती एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे.
नवरीला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी लक्ष्मण सिंह चंपावत यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं. फोनवर पाळत ठेवून महिला दलाल मनीषा सेन हिला प्रथम अटक करण्यात आली आणि तिची कडक चौकशी करण्यात आली. ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी चोरीचा माल घेऊन पळून गेलेल्या नववधूला पकडण्यासाठी सापळा रचून तिलाही लवकरच अटक केली.
पोलिसांनी नवरीकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वधू उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. तिच्याकडे सापडलेले सोन्याचे दागिने तपासण्यात येत आहेत. आता या महिलेनं अशा पद्धतीने किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
0 Comments